परभणी / वार्ताहर - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ दिवाळीनिमित्त बाजारात सर्वत्र खरेदीची धूम आहे. फटाक्यांसह आकर्षक आकाशकंदिलांची लोक चोखंदळपणे निवड करताना दिसत आहेत. दुसरीकडे फराळाचे साहित्य घेण्याऐवजी थेट फराळाचे पदार्थच विकत घेण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल असल्याचे दिसून येत आहे. |
रोज १६ तासच होणार उपसा औरंगाबाद/प्रतिनिधी येथील औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठय़ात ऐन दिवाळीत २५ टक्के कपातीचा फटका बसणार आहे. दररोज केवळ १६ तासच पाणी उपसा केला जावा, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्यामुळे ४० एमएलडी पाण्याचा उपसा होण्याची शक्यता आहे. |
शिवसेनेचा आयुक्तालयावर मोर्चा औरंगाबाद/प्रतिनिधी नगर व नाशिकचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. वरच्या धरणांतील पाणी सोडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना होत नसेल तर त्यांनी या पदावर बसू नये, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार सुभाष देसाई यांनी केली. दंगल घडवू ही भाषा शोभणारी नाही. |
मनपाने पाठवला सरकारकडे प्रस्ताव लातूर/वार्ताहर महापालिकेने तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी १५ लाख, तसेच साई व नागझरीच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ६७ लाख रुपये मंजूर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. |
नांदेड/वार्ताहर नांदेड विभागांतर्गत पाच जिल्ह्य़ांत १४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, आतापर्यंत १ लाख ७६ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. |
परभणी/वार्ताहर तिसऱ्या अखिल भारतीय दोन दिवसीय गुरू रविदास साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) होणार आहे. या निमित्त सकाळी ग्रंथ परिवर्तन फेरी काढण्यात येणार आहे. |
हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ातील वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या गिरगाव येथील बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात राहटी शिवारात सापडल्याने या भागात एकच खळबळ उडाली. |
हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ातील वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या गिरगाव येथील बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात राहटी शिवारात सापडल्याने या भागात एकच खळबळ उडाली. |
हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ातील वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या गिरगाव येथील बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात राहटी शिवारात सापडल्याने या भागात एकच खळबळ उडाली. |
हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ातील वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या गिरगाव येथील बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात राहटी शिवारात सापडल्याने या भागात एकच खळबळ उडाली. |
वाहने दोन, चालक एकच! नांदेड/वार्ताहर नियोजनाचा अभाव, मुख्य उद्देशाला हरताळ, वाहनचालकांची आर्थिक पिळवणूक हाती घेऊन कार्यरत असलेल्या महामार्ग पोलिसांकडे वाहने दोन असली, तरी चालक मात्र एकच आहे! नांदेडचे महामार्ग पोलीस केवळ भोकर विधानसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित असल्याचे समोर आले आहे. |
ग्रामपंचायत निवडणूक बीड/वार्ताहर ग्रामपंचायत सरपंचपदाच्या महिला आरक्षणाच्या सोडतीला बहुसंख्य इच्छुक उमेदवारांचे पतीच मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकूण ७०५ पैकी जवळपास साडेतीनशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा कारभार महिलांच्या हाती निश्चित झाला आहे. |
हिंगोली/वार्ताहर सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्य़ात १ लाख १ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यासाठी ३ कोटी ५८ लाख ८२ हजार ७८७ रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी केवळ ८५ हजार ५५९ विद्यार्थ्यांनाच शालेय गणवेश वाटप झाले. अजूनही १६ हजार १४४ विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. |
लातूर/वार्ताहर सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत ज्या सहकारी दूध संस्थांनी लातूर जिल्हा दूध संघास दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांना दिवाळीनिमित्त प्रतिलिटर २० पैसेप्रमाणे दर फरकाची ८ लाख ६१ हजार ५३५ रुपये रक्कम अदा करण्याचा, तसेच कर्मचाऱ्यांनाही १६.६६ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. |
बीड/वार्ताहर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आधी स्पष्ट केले होते. मात्र, निवडणूक मूळ कायद्यात अशी तरतूद नसल्यामुळे पुन्हा हे प्रमाणपत्र बंधनकारक नसल्याचे सांगण्यात येत आहे. |
मूलभूत शैक्षणिक सुविधांचा दुष्काळ औरंगाबाद/प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ मराठवाडय़ातल्या सुमारे ९० महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा नाहीत. काही ठिकाणी इमारती नाहीत. काही ठिकाणी क्रीडांगणे नाहीत, तर बऱ्याच ठिकाणी प्रयोगशाळादेखील नाहीत, अशा महाविद्यालयांची प्रतवारी ठरविल्यानंतर ४० टक्के गुणांपेक्षा कमी असणाऱ्या महाविद्यालयांना केवळ संधी म्हणून एक वर्षांचीच संलग्नता कशीबशी मिळू शकेल. |
जिल्हा बँकेकडील १३५ कोटी थकीत उस्मानाबाद मराठवाडय़ातील पहिला सर्वाधिक गाळप क्षमतेचा म्हणून ओळख असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ऐन दिवाळीत जप्तीची कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली असताना कर्जबाजारी झालेल्या तेरणा कारखान्याकडे जिल्हा बँकेकडील १३५ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई होणार आहे. तसा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी गेल्या १ नोव्हेंबरला दिला. |
उद्यापासून जनजागृती मोहीम जालना/वार्ताहर शहरात विविध प्रकारच्या तापाचे सुमारे पाच हजार रुग्ण असल्याची माहिती मिळाली. यात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्याही मोठी असून या दृष्टीने व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे ‘रोटरी क्लब ऑफ जालना रेन्बो’ च्या या संदर्भातील मोहिमेचे प्रकल्पप्रमुख डॉ. राजेश सेठिया यांनी सांगितले. |
औरंगाबाद/प्रतिनिधी छताचा सिमेंटचा थर कोसळून दोन महिला किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथे जिल्हा व सत्र न्यायालयात घडला. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला. जखमी महिलांना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले. |
परभणी/वार्ताहर चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याप्रकरणी परभणीतील क्रांतिनगर येथे शेख लतीफ शेख नबी व शेख अन्वर शेख चाँद या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 26 |