विश्वासराव सकपाळ ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
मंत्रालयाला लागलेल्या आगीला तीन महिने उलटून गेले. आग लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे महिनाभरात फायर ऑडिट (अग्निपरीक्षण) करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था व खाजगी इमारतींचे फायर ऑडिट तीन महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु याबाबत अजूनही काहीच हालचाल दिसत नाही. |
वासुदेव कामत ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्याची चार दशकं चाळीतल्या भाडय़ाच्या खोलीत राहिल्यामुळे आपलं स्वत:चं घर असावं, याची स्वप्नं मी अनेक वेळा रंगविली. याचा अर्थ मी चाळीतल्या जीवनाला कंटाळलो होतो, असा अजिबात नाही. उलट तिथंसुद्धा मी आनंदात आणि गुण्यागोविंदाने राहिलो आहे. केवळ आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच नव्हे, तर चाळीतल्या अन्य बिऱ्हाडांतल्या व्यक्तीदेखील आपल्याच कुटुंबाचे घटक असल्यासारखे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध मी अनुभवले. |
प्राजक्ता कदम , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सध्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अशावेळी आपल्या संरक्षणासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता आपणही समाजात जागरूकतेने वावरायला हवे. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. मुंबई हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर मानलं जातं. इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठीही मुंबईनगरी ही कैकपटीने सुरक्षित मानण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमधील मुंबईतील गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या वाढत्या घटना पाहाता मुंबईत नागरीकांच्या विशेषत: महिला, ज्येष्ठनागरीक व लहानग्यांसाठी इथलं वातावरण अधिक असुरक्षित होत चालल्याचं दिसून येत आहे. |
सुधीर मुकणे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ आपल्या सुंदर व सशक्त कल्पनेतून ऑर्किटेक्ट कागदावर इमारतीचे नकाशे, आराखडे बनवत असतो; व माझीच इमारत लक्षवेधी ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या कल्पनेला सत्यात उतरविण्याचे काम अभियंता करीत असतो. तोच त्या इमारतीचा खरा दिग्दर्शक असतो. इमारतीच्या निर्मितीच्या कामांमध्ये जर का कोणावर जास्त जबाबदारी असते तर तो म्हणजे ‘साइट इंजिनीअर्स’, ‘प्रकल्प अभियंते’ यांच्यावर. त्यांच्या बरोबरीने काम करणारे त्यांचे सुपरवायझर्स, शिकाऊ इंजिनीअर्स ते महत्त्वाच्या पदावर काम करणारे सर्वच अभियंते हे इमारतीचे भवितव्य घडवीत असतात. |
वि. रा. अत्रे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ मुख्य वास्तुशास्त्रज्ञ (निवृत्त), महाराष्ट्र शासन वाढत्या शहरीकरणाच्या रेटय़ात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे. वा ढते शहरीकरण, जागांची कमतरता, गगनाला भिडणारे भाव यात सुंदर घराचे स्वप्न कुठल्या कुठे वाहून गेल आहे. आणि या स्वप्नांना ‘थ्री बीएचके’, ‘टू बीएचके’, ‘वन बीएचके’, आणि नुसताच ‘एचके’ असे आचके बसत आहेत. |
अरुण मळेकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ मंदिरशिखरावर एकूण ४७ सुवर्णविलोपित कळस असून त्यांचे दर्शन दूरवरूनही घडते. शिखरावरील १५०० किलो वजनाचा सोनेरी कळस हे तर मंदिर-वैशिष्टय़ आहे. ग तिमान मुंबई शहराला अनेक शतकांचा इतिहास आहे. या महानगरीतील अनेक धर्मीयांच्या वास्तव्यामुळे येथील विविध धार्मिक प्रार्थनास्थळांनी देशव्यापी लोकप्रियता मिळविली आहे. तर त्यातील काहींचा परदेशातही बोलबाला झाला आहे. वांद्रय़ाची मोतमाऊली, हाजीअलीचा दर्गा, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, आर. सी. चर्च इत्यादी धार्मिक स्थळांमध्ये दादर विभागातील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराकडे भाविक-भक्तगणांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोच आहे. |
नंदकुमार रेगे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान काय, या प्रश्नावर सध्या जोरदार विचारमंथन चालू आहे. कारण अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत महिलांच्या नावे खरेदी खत असते. कित्येक वेळा असे खरेदी खत एकाच व्यक्तीच्या नावे असते, तर काही वेळा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असते; परंतु खरेदी खतात ज्या व्यक्तीचे नाव प्रथम क्रमांकावर असते, अशी व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची सभासद म्हणून गणली जाते आणि अन्य व्यक्ती ‘सहयोगी’ सभासद म्हणून गणल्या जातात. अशा व्यक्ती मूळ सभासदाच्या अनुपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभेला एकमेकांच्या अनुपस्थितीत उपस्थित राहू शकतात, अशी तरतूद सहकार कायद्याचे कलम २७(२) मध्ये आहे. |
संज्योत दुदवडकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ इंटिरिअर डिझायनर घर म्हटलं की काही वस्तू या ठरलेल्याच असतात. मूलभूत किंवा गरजेच्या वस्तूंमध्ये यांची गणना होते. जसे की, बठकीची मांडणी, बेड, वॉल युनिट, वॉर्डरोब, किचन ट्रॉलीज् वगरे. तर काही वस्तू या बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात घरात विराजमान कराव्या लागतात. आता ड्रेसिंग टेबलचंच बघा ना. आज घरातल्या फíनचरच्या यादीत ड्रेसिंग टेबललासुद्धा अग्रक्रम द्यावा लागतोय. पूर्वीसुद्धा हे ड्रेसिंग टेबल आपल्याकडे होतं, पण त्याचं रूप खूपच वेगळं होतं. आज मात्र चित्र वेगळं आहे. मुळात बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यप्रसाधनासाठी स्वतंत्र असं एखादं युनिट असावं हे आज अत्यंत आवश्यक झालंय. राहणीमानात, पेहरावात झालेले बदल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या वस्तूंची नेटकी मांडणी गरजेची झाली आहे. ही नेटकी मांडणी करण्यासाठी तसंच खास अत्याधुनिक कपाट असलं पाहिजे. |
शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
संस्थेने आपल्या एका सदस्याला त्याची सदनिका विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सप्टेंबर २००४ साली दिले. त्यानंतर संस्थेच्या असे लक्षात आले की, त्या सदस्याकडून संस्थेचे काही पैसे येणे बाकी आहेत. सदर येणे संस्था आता वसूल करू शकते का? - र. श. धुरी, वांद्रे, मुंबई-५०. |
शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ जुन्या स्मृती जाग्या झाल्या ‘वास्तुरंग’ पुरवणीत (११ ऑगस्ट) अरुण मळेकर यांचा ‘मणिभवन: युगपुरुषाची वास्तव्यवास्तु’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख माहितीपूर्ण व औचित्यपूर्ण झाला आहे. मी सुमारे १२ वष्रे मणिभवनचा विश्वस्त होतो. त्यामुळे हा लेख वाचून या ऐतिहासिक वास्तुसंबंधी अनेक आठवणी मनात दाटून आल्या. |
मनोज अणावकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
काचेच्या इमारतींमुळे वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेतल्यास काचेच्या इमारतींमधला फोलपणा लक्षात येतो. एखादी दुर्घटना झाल्यास अशा प्रकारच्या इमारतींमुळे माणसाच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, याची प्रचीतीच वांद्रे-कुर्ला संकुलात सिटी बँकेच्या इमारतीला लागलेल्या आगीने आली आहे. अलीकडेच मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सिटी बँकेच्या इमारतीला आग लागल्यानंतर काचेच्या इमारतींची सुरक्षितता आणि या इमारतींचे पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबतचा विषय चच्रेत आला. |
अच्युत राईलकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हेरिटेज वास्तूंची यादी जाहीर केली, त्याविषयी.. मुंबईमध्ये जो कोणी बरेच वष्रे राहून फिरला असेल त्याच्या तत्काळ लक्षात येईल की बृहद्मुंबईमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर काही अनेक महत्त्वाच्या अभिमानास्पद अशा वास्तू बांधल्या गेल्या. त्या इमारती सरकारी, शिक्षण क्षेत्रातील, व्यापारी, मोठय़ा उद्योगधंद्यांच्या, प्रार्थनास्थळे असतील वा अनेक वास्तू उघडी मदाने, तलाव, सरोवरे इत्यादीही असतील. |
|
|