डॉ. प्रशांत गांगल, मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२ ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. जागतिक स्तनपान सप्ताहात आपण स्तनपानाविषयी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपलब्ध असलेली मदत यासंबधीची माहिती निरनिराळे लेख आणि लघु चित्रकटांच्या माध्यमातून लोकसत्ताच्या ब्लॉगवरून जाणून घेऊ यात. यानिमित्ताने लोकसत्तामध्ये प्रसिध्द झालेले काही विशेष लेख वाचकांसाठी पुर्नमुद्रीत करत आहोत. |
शुभदा चौकर, सोमवार, ६ ऑगस्ट २०१२ ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. मातेच्या दुधाचे महत्व आता नि:शंकपणे मान्य झालेले आहे. ट्याव्र अनेक वैज्ञनिक शोधनिबंधही लिहिले गेले आहेत. तरीही अनेक शहरी तसेच ग्रामीण भागातेल मातांना बाळ जन्मल्यावर साभराच्या आत स्तनपान सुरू करायला अनेक अडचणी येतात. आपल्या देशात जेमतेम २०%माता आपल्या बाळाला सहा महिन्यापर्यंत स्तनपान देतात. मातेच्या मनातल्या याबद्दलच्या शंका आणि तिला येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात असा प्रयत्न “युनिसेफ” तर्फे अनेक उपक्रमाद्वारे केला जातो. |
युनिसेफ प्रतिनिधी, मंगळवार, १९ जून २०१२ बाल मजुरी बाबत जेव्हा जेव्हा विचारणा केली जाते तेव्हा तेव्हा काही मुद्द्यांवर येऊन आपण सर्वच मोठी माणस पुढील काही गोष्टीवर येउन थांबतो; - बालमजूर १४ वर्ष कि १८ वर्ष ? - बालमजूर कुणाला म्हणता येईल ? - आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला काय करता येईल ?
|
युनिसेफ प्रतिनिधी, शुक्रवार, १५ जून २०१२ गेल्या तीन दिवसांपासून प्रसिद्ध होणा-या या लेखमालेतले लेख वाचणा-या अनेक मंडळींनी मला प्रश्न केला आहे की, जर सरकारने बालमजुरीविरोधी कायदा केलेला आहे आणि ब-याच संस्था गावोगावी या विषयावर काम करीत आहेत, तरीही आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बालमजुरी का सुरू रहाते? भारतात १७ दशलक्ष मुले बालमजुरी करतात यावर अनेक मध्यमवर्गीय माणसांचा मुळी विश्वासच बसत नाही.
|
युनिसेफ प्रतिनिधी , गुरूवार , १४ जून २०१२ नुकतेच दहावी –बारावीचे निकाल जाहीर झालेत. मार्क,टक्केवारी,प्रवेशपरिक्षा यांच्या चर्चा सुरु आहेत! भरपूर टक्केवारी मिळवलेल्या मुलांचे कौतुक होत आहे, त्यांच्या मुलाखती छापून येत आहेत – क्वचित कधीतरी अतिशय खडतर परिस्थितीतून मेहनत करून भरपूर गुण मिळवलेल्या कष्टाळू मुलांच्या मुलाखतीदेखिल वाचायला मिळतात. . . .शहरांतल्या वस्त्यांमध्ये रहाणारी ही मुलं बहुतेकवेळा काही ना काही काम करून घराला हातभार लावत असतात. . . |
युनिसेफ प्रतिनिधी, १३ जून २०१२ मराठवाड्यातलं एक रखरखीत गाव – चांदई - एक्को! जालना जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडं. जेमतेम हजार उंबरा लोकवस्ती. भोकरधन तालुक्यापासून एक-दीड तास खडबडीत रस्त्याचा प्रवास करून मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात आम्ही चांदई ला पोहोचलो! रस्त्यात वाळलेल्या झाडांचीच तेवढी सोबत होती. कापसाच्या शेतामधला सगळा कापूस काढून झाल्याने शेतं रिकामी झाली होती. बांधाबांधावर उरलेल्या काटक्यांच्या मोळ्या रचून ठेवलेल्या दिसत होत्या. घरांच्या अंगणात बाया वाळवणाची कामं करीत बसलेल्या होत्या.
|
युनिसेफ प्रतिनिधी, १२ जून २०१२ १२जून हा आंतरराष्ट्रीय बालमजुरीविरोधी दिन म्हणून पाळला जातो. आपापल्या घरात सुरक्षितपणे जगताना, आपल्या मुलाबाळांचे लाड पुरवताना या दिवसाचे महत्त्व आणि अस्तित्त्व अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही!
घरात, शेतावर, बांधकामावर, धाब्यावर, हॉटेलमध्ये काम करणारी लहान मुले पहायची आपल्या नजरेला इतकी सवय झालेली असते की लहान मुलांची खरी जागा शाळा आणि खेळायची मैदाने आहेत- हेच जणू आपण विसरून गेलेलो असतो!
|
शेखर जोशी, सोमवार , ११ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रेल्वेने नियिमत प्रवास करणारे प्रवासी रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक विशिष्ट प्रकारचा आवाज दररोज नक्की ऐकत असतील. कदाचित काही जणांना तो आवाज कर्णकर्कश्श वाटत असेल तर फलटावरील गर्दीच्या कोलाहालात अनेकांना तो ऐकूही येत नसेल. पण जरा नीट लक्ष दिले तर रेल्वेच्या फलाटांवर हा आवाज सतत ऐकू येत असतो, हे लक्षात येईल. हा आवाज कसला, कशासाठी आणि कोणासाठी येत असतो, याचे उत्तर मला नुकतेच एका प्रसंगातून मिळाले. |
शेखर जोशी, बुधवार , ६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मान्सून केरळमध्ये पोहोचल्याच्या बातमीमुळे आपण सर्वानीच हुश्श केलं असेल. त्याचा पुढील प्रवास जर सुरळीत झाला तर आठ ते दहा दिवसात तो मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. पुणे, सातारा, सांगली आदी भागात मान्सूनपूर्व सरी या आधी पडून गेल्या. तिथे गारांही पडतात. मुंबई आणि परिसरातील नागरिकांना वळवाच्या किंवा गारांच्या पावसाचा अनुभव नसला तरी पहिला पावसाचा अनुभव आहे. |
शेखर जोशी, सोमवार , ४ जून २०१२ सुभाषित हा प्रकार आपल्यापैकी बहुतेकजणांनी शाळेत असताना अभ्यासला असेल. ज्यांनी शंभर गुणांचे संस्कृत घेतले असेल त्यांना तर ही सुभाषिते अभ्यासासाठी पाठ करावी लागली असतील. आठवी ते दहावीचा अभ्यास करताना ज्यांनी संस्कृत विषय घेतला होता, त्यापैकी अनेकांना आपम त्याकाळी संस्कृत सुभाषितांची केलेली घोकंपट्टी आठवत असेल. शाळा संपली आणि संस्कृत सुभाषितांचा अभ्यासही मागे पडला असेल. |
शेखर जोशी, १ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. कधीकधी असं वाटतं की या सर्व कविता आपल्याला पुन्हा वाचायला मिळाल्या तर किती मजा येईल. |
अभिजित बेल्हेकर , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज (२९ मे) एव्हरेस्टदिन! बरोबर आजच्या दिवशी सन १९५३ साली सकाळी साडेअकराच्या सुमारास एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग या दोन गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च अशा भूमीवर पहिले पाऊल ठेवले. यामुळे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्टदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी नुकतेच आमच्या मराठी गिर्यारोहकांनी या शिखराला गवसणी घातली. त्यांचे हे अभूतपूर्व यश आणि या दिवसाच्या निमित्ताने या एव्हरेस्ट शिखराची ही जन्मकुंडली! |
|
|
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>
|
Page 1 of 3 |