|
महाराष्ट्र
नाशिक, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे (मेटा) मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार समिती सदस्य विजय पांढरे यांनी स्वेच्छा निवृत्तीचा सादर केलेला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सिंचन कामावर दशकभरात खर्ची पडलेल्या निधीपैकी तब्बल ३५ हजार कोटीचा निधी पाण्यात गेल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पांढरे हे प्रकाशझोतात आले. |
महाराष्ट्रात मद्य विक्रीचा उच्चांक देशी दारू शौकिनांचीही संख्या वाढली खास प्रतिनिधी,
नागपूरमहाराष्ट्र सरकारला मद्यविक्रीच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल वसुलीचे हे चित्र कितीही हिरवेगार वाटत असले तरी यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनी पिढी सारासार विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही. हे अभिमानाचे नव्हे तर लाजिरवाणे चित्र आहे.- डॉ. अभय बंग , सामाजिक कार्यकर्त महाराष्ट्रात मद्यावर सर्वाधिक कर लादण्यात आल्यानंतरही मद्यशौकिनांना याचा फरक पडलेला नाही, असेच चित्र उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे.
|
विशेष प्रतिनिधी, पुणे
‘‘ऊसदराच्या आंदोलनामुळे कारखाने बंद पडले तर शेतकरी ऊस कुठे घालणार? चांगला भाव घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे, त्यासाठी बसून निर्णय करावा लागेल, पण आंदोलनामुळे कारखानेच बंद पडायला लागले तर ते योग्य ठरणार नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आंदोलक शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. |
‘झी २४ तास’ व ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर चर्चा प्रतिनिधी, पुणे समस्या सोडविण्यासाठी सक्षम नसताना नव्याने २८ गावांचा पुण्यात समावेश करून घ्यायचा निर्णय का घेतला?.. झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनाचे गाजर तर दाखविले पण पुढे काहीच का झाले नाही?.. पुण्यातले रस्ते बकाल का?.. वाहतूक व्यवस्थापनाचे बारा का वाजले?.. |
दोन वर्षांनंतर सरकारला मुहूर्त गवसला देवेंद्र गावंडे, चंद्रपूर नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी नागपुरात उभारण्यात आलेल्या केंद्राचे प्रमुखपद निवृत्त लक्षरी अधिकाऱ्याला देण्याचा गृह खात्याचा प्रस्ताव आता तब्बल दोन वर्षांनंतर अमलात येणार आहे. त्यानुसार निवृत्त कर्नल साहबीरसिंग जज यांची या केंद्राचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा दर्जा देण्यात आला आहे. |
वार्ताहर , जळगाव आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वेगळा विचार केल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून त्यांची तयारी करून घेत आहोत, असे स्पष्ट करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळासाठी तयार राहण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले. |
प्रतिनिधी, औरंगाबाद जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना बदला आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही मराठवाडय़ात पाऊल ठेवू देऊ नका, असा आदेश शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाणीप्रश्नी आयोजित मोर्चात दिला. |
प्रतिनिधी, अलिबाग
पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलत होते. |
खास प्रतिनिधी, रत्नागिरी
जहाजबांधणी क्षेत्रातील येथील प्रसिध्द कंपनी भारती शिपयार्डने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे कामगारक्षेत्रात खळबळ उडाली असून ठेकेदारी पध्दतीमुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी येथील मिऱ्या बंदर भागात स्थापन झालेल्या या कंपनीने जहाजबांधणी व दुरुस्तीच्या क्षेत्रात नाव कमावले. पण गेल्या महिन्यांपासून कामगारांना नियमितपणे पगार मिळणे बंद झाल्यामुळे वातावरण चिघळू लागले. |
मनमाड पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र पगारे यांची शुक्रवारी आयोजित विशेष सभेत अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. पगारे यांना २२, तर शिवसेनेचे गटनेते संतोष बळीद यांना ४ मते मिळाली. |
वार्ताहर , सावंतवाडी नाटय़दर्शन सावंतवाडीने रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकपात्री अभिनयात कलाकार सुरेश पुराणिक यांच्या अवसार (देव) संचारण्याच्या कलेस तसेच महागाईत होरपळलेल्या कुटुंबाचे मालवणीत सादरीकरण करणाऱ्या अथर्व विराज पित्रे या आठवर्षीय कलाकाराच्या कलाकृतीस उपस्थितांनी दाद दिली. |
वार्ताहर, जळगाव स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडविण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. परंतु बिकट परिस्थितीमुळे त्या संधीपासून वंचित राहतात. तशी इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगावच्या दीपस्तंभने स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियानास सुरुवात केली असून खान्देशातील तिन्ही जिल्ह्य़ांत ९ डिसेंबर रोजी स्थानिक महाविद्यालयात ही परीक्षा होत आहे. |
खास प्रतिनिधी, रत्नागिरी जहाजबांधणी क्षेत्रातील प्रसिध्द कंपनी भारती शिपयार्डने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे कामगारक्षेत्रात खळबळ उडाली असून ठेकेदारी पध्दतीमुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. पस्तीस वर्षांपूर्वी मिऱ्या बंदर भागात स्थापन झालेल्या कंपनीत गेल्या महिन्यांपासून वातावरण चिघळू लागले. |
वार्ताहर , सावंतवाडी वातावरणातील बदलामुळे सिंधुदुर्गात तापाचे रुग्ण फणफणताहेत, पण त्यात मलेरिया किंवा डेंग्यूचा रुग्ण नाही, तसे वैद्यकीय निदान झाल्याची माहिती जिल्हा परिषद वैद्यकीय अधिकारी डॉ. सोडल यांनी बोलताना दिली. जिल्ह्य़ात रामगड व उंबर्डे येथे आढळून आलेले दोन रुग्ण डेंग्यूच्या तापाचे नव्हेत. |
वार्ताहर , सावंतवाडी गिरणी कामगार कर्मचारी व निवारा कल्याणकारी कर्मचारी संघटनेत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उभी फूट पडली आहे. वेंगुर्ले येथे झालेल्या गिरणी कामगारांच्या बैठकीत सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघ अशा नवीन संघटनेची निर्मिती करून तिच्या जिल्हाध्यक्षपदी दिनकर मसगे यांची घोषणा करण्यात आली. |
धाडसी निर्णय घेण्याचे पवारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन विशेष प्रतिनिधी, पुणे ‘‘मराठवाडय़ात माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणी नसताना वरून पाणी न सोडणं हे माणुसकीच्या विरोधी आहे. पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ातील लोकांना माझी विनंती आहे अशी भूमिका घेऊ नका. महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचे आवाहन केले. |
विशेष प्रतिनिधी, पुणे औद्योगिक विकासाबाबत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रेसरच आहे, त्यामुळे आपली तुलना गुजरात किंवा इतर राज्यांशी करायला नको. मात्र, लोकसंख्येच्या दृष्टीने आपण जगातील बारावे राष्ट्र ठरावे इतके मोठे आहोत, त्यामुळे याबाबत आपली स्पर्धा जगातील इतर देशांशी करायला हवी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. |
खास प्रतिनिधी, चंद्रपूर गेल्या वीस वर्षांपासून चळवळीत सक्रिय असलेला व गेल्या सात वर्षांपासून दक्षिण गडचिरोली विभागाचे नेतृत्त्व करणारा जहाल नक्षलवादी शेखर अण्णा व त्याची पत्नी विजयाक्का यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्हय़ात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. |
सहा डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेण्याचा इशारा प्रतिनिधी, अलिबाग पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला. |
सिटूचा इशारा प्रतिनिधी , नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये कार्यरत हंगामी व प्रशिक्षणार्थी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, अन्यथा कंपनी मालकांच्या घरांसमोर दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्यात येईल, असा इशारा सिटूतर्फे देण्यात आला आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|