सुनील चावके, सोमवार, ५ नाव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
केंद्रातील सत्ताधारी यूपीए, मुख्य विरोधी पक्ष भाजप आणि सिव्हिल सोसायटीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणावरील महाराष्ट्राच्या या वर्चस्वाचा उदय जवळपास एकाच वेळी झाला आणि गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा लोप होण्याची प्रक्रियाही एकाच वेळी सुरू झाली. राष्ट्रीय राजकारणावरील महाराष्ट्राचा हा घसरता प्रभाव तात्पुरता आहे की ही न थांबणाऱ्या घसरणीची सुरुवात आहे?
|
सुनील चावके, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुक्त, निपक्ष आणि निर्भय मीडियामुळे राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराला बऱ्याच अंशी लगाम लागत आहे, हे खरे असले तरी मीडिया ट्रायलमुळे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होण्यापूर्वीच मी मी म्हणणारे कायमचे जायबंदी झाले आहेत.- ‘आम्ही काय म्हणतोय, ते कृपया जनतेपर्यंत पोहोचू द्या. आम्ही लढत असताना वृत्तपत्रांमध्ये त्याचे योग्य प्रतिबिंब उमटायला हवे..’ २००४ साली लोकसभा निवडणुकांचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते मीडियाला कळकळीने आवाहन करीत होते.
|
सुनील चावके, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुख्य विरोधी पक्षाची सूत्रे हाती घेताना आपल्या उद्यमशील वृत्तींना मुरड घालण्याचे पथ्य गडकरींना आजवर पाळता आलेले नाही. अध्यक्षपदाचे गांभीर्य त्यांनी न ओळखल्यास, पक्षांतर्गत हितशत्रूंना अपघात घडवण्याची संधी पुन्हा मिळेल... सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी अवघ्या तीन-चार वर्षांत ५० लाखांचे पाचशे कोटी रुपये करून दाखविले, तर त्याच कालावधीत विजय मल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सची हजारो कोटींची मालमत्ता कवडीमोल झाली. पैशाचा प्रचंड दर्प चढलेले वढेरा आणि मल्या एकाच वेळी मालामाल आणि दिवाळखोर कसे झाले, याचे ‘इट्स ऑल अबाऊट चेसिंग द राइट वुमन’ अशा शब्दांत वर्णन करणारा एसएमएस सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात लोकप्रिय ठरतो आहे.
|
सुनील चावके, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
थेट गांधी घराण्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाताना सोनियांच्या अधिपत्याखालील केंद्रातील सर्वशक्तिमान सरकार तसेच त्यांचा देशव्यापी काँग्रेस पक्ष आरोपांमुळे आलेली हतबलता दूर करू शकलेला नाही. आरोप फोटाळताना रॉबर्ट वढेरा यांनी केलेली शेरेबाजी सोनिया गांधींनाही लागू होऊ शकते याचे भान त्यांना राहिले नाही. सोनियांच्या वर्चस्वाला एक प्रकारे आव्हान मिळू लागले आहे. सोनियांचा दरारा आणि महत्त्व अबाधित राखून काँग्रेसचा ‘बनाना’ होण्याचे टाळण्याची केंद्रातील ‘मँगो’ नेत्यांमध्ये क्षमता आहे की नाही, हे दिसणार आहे..
|
सुनील चावके, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पृथ्वीतलावरील काश्मीरच्या नंदनवनाने गेल्या वीस वर्षांत नरकयातना भोगून ‘जहन्नुम’ काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. आज क्षणिक का असेना, तिथे पुन्हा ‘जन्नत’ अवतरली आहे. ती टिकवून ठेवण्याचे आव्हान राज्यकर्त्यांपुढे आहे.. राहुल गांधी यांच्या पुढाकाराने श्रीनगरमध्ये काश्मीर विद्यापीठाचे सुमारे दीड हजार निवडक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक पारेख, राजीव बजाज, अशोक रेड्डी यांच्यासारख्या आघाडीच्या उद्योजकांशी काश्मीरच्या आर्थिक विकासाविषयी संवाद साधत असताना जुम्म्याच्या नमाजाचा मुहूर्त साधत फुटीरवादी गटांनी अस्वस्थ व बेरोजगार तरुणांना उत्तेजित करून सभागृहाबाहेरचा माहोल तापविण्याचा प्रयत्न केला.
|
सुनील चावके, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ऐन उमेदीची दशके या संघर्षांत खर्ची घातल्यानंतर या बुजुर्गाच्या अस्तित्वाला विरोधकांनी वा प्रतिस्पध्र्यानी नव्हे; तर वारसांनीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आव्हाने उभी केल्याचे गेल्या काही दिवसांत दिसले.. लालकृष्ण अडवाणी, अण्णा हजारे आणि शरद पवार या तीन बुजुर्गाचे ‘भावविश्व’ सध्या ढवळून निघाले आहे. वैचारिक ‘वारसा’ पुढे चालविणाऱ्या आपल्या तरुण व विश्वासू सहकाऱ्यांच्या आक्रमकतेमुळे अण्णा, अडवाणी आणि पवार यांच्या दिल्लीतील भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
|
सुनील चावके, सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
परस्परविरोधी भूमिका घेऊन राजकारण करणारे मनमोहन सिंग, ममता बनर्जी, मुलायमसिंह यादव, मायावती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात सध्या एक समानता आहे. ती म्हणजे प्रत्येकाची कुठली ना कुठली मजबुरी आहे. सध्या देशाच्या राजकारणात चाललेली उलथापालथ या मजबुरीतूनच उद्भवलेली आहे.राजकीय मजबुरीची शृंखला यापुढेही या सर्वाना भेडसावत राहणार आहे..
|
सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
डॉ. मनमोहन सिंग यांनी धोरणलकवा सोडून गेल्या आठवडय़ात दूरगामी निर्णयांची भरारी मारून विरोधकांना कामाला लावले आहे. किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीविषयी गळा काढणारे भाजपसारखे पक्ष ज्यांचे प्रतिनिधित्व करू पाहत आहेत त्यातील शहरी मध्यमवर्गीयांची मते विदेशी गुंतवणुकीबाबत विरोधाचीच आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..
|
सुनील चावके, सोमवार, १० सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कदाचित पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांची नियुक्तीच भ्रष्टाचारावर देखरेख करण्यासाठी झाली असावी, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. ते एकाकी पडले नसले तरी वेळ आल्यास त्यांच्याच माथी खापर फोडून काँग्रेस पक्ष नामानिराळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निष्कलंक प्रतिमेवर गेल्या वर्षी अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांचे ओरखडे उमटले.
|
सुनील चावके - सोमवार, ३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोळसा खाणींच्या वाटपाचा घोटाळयाचे अस्त्र हाती लागताच गेल्या आठवडय़ात मोठी उभारी घेतलेल्या भाजपच्या नेतृत्वाने आता कच खायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा अग्रक्रम बदलला आहे. केंद्रात बहुमतात असलेला काँग्रेस पक्ष कोळसा घोटाळ्याचा प्रमुख लाभार्थी असेल तर भाजपही भासवतो तेवढा शुचिर्भूत नाही, हेच अलीकडच्या घटनांनी स्पष्ट होत आहे.
|
सुनील चावके - सोमवार, २७ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
युपीए-२ सरकारच्या महाघोटाळ्यांच्या मालिकेची शेवटची कडी कोळसा खाण घोटाळ्याच्या निमित्ताने हाती आल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर देशभर वातावरण तापवायचे आणि सोळाव्या लोकसभेत सत्तेत परतण्यासाठी राजकीयदृष्टय़ा तंदुरुस्त व्हायचे, असा फिटनेस प्रोग्रॅम भाजपने हाती घेतला आहे. पंधराव्या लोकसभेचे शेवटचे वीस महिने उरले आहेत. लाखो-कोटींचे घोटाळे, अण्णा-बाबांच्या आंदोलनाला न जुमानणारा भ्रष्टाचार, आयुष्याची कमाई ओरबाडून काढणारी महागाई आणि अर्थव्यवस्थेतील पशू ‘जागा’ करण्यात असमर्थ ठरलेली धोरणनिष्क्रियता संपण्याची चिन्हे नसल्यामुळे निष्प्रभ मनमोहन सिंग सरकारचा सर्वसामान्यांना उबग आला आहे.
|
सुनील चावके - सोमवार, १३ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करून प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती भवनाचा निरोप घेतल्यानंतर एक आठवडय़ाच्या आतच सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने आणखी एका मराठी नेत्याला नॉर्थ ब्लॉकमधील गृहमंत्रालयाच्या जबाबदारीसह रायसीना हिल्सवर मोठी संधी देण्यात आली. काही दिवसांतच लोकसभेचे नेतृत्वही त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|