शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
भारताचे कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल (कॅग) विनोद राय यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमोर बोलताना भारतातील दक्षता आयोग आणि सीबीआय या संस्था सरकारच्या बटिक असल्याचा आरोप करून नवा धुरळा उडवून दिला आहे. लोकपाल या पदाला केवळ संविधानात्मक पाठबळ देऊन चालणार नाही, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्यही दिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. कॅग हीही घटनात्मक अधिकार असलेली संस्था आहे. |
शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
मोहम्मद अझरुद्दीन याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लादलेल्या आजन्म बंदीच्या शिक्षेला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या निर्णयाचे स्वागत करण्यास कुणीही तयार होणार नसले तरी त्यामुळे एक हळवा कोपरा मात्र नक्कीच सुखावणार आहे. २०००साली मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीकांडाने भारतीय क्रिकेटप्रमाणेच जागतिक क्रिकेटही नखशिखांत ढवळून गेले होते. |
गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
पश्चिम बंगालला कृषिप्रधान काळात लोटण्याचा निश्चय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला दिसतो. चार वर्षांपूर्वी त्यांनी सिंगूर व नंदीग्राममध्ये आंदोलनाची लाट उठवून दिली आणि टाटांचा नॅनो प्रकल्प बंगालबाहेर पडला. शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांना देता कामा नयेत हा आग्रह त्यामागे होता.
|
गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही पक्षांमधील नेत्यांशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊनही त्याचा राज्यातील जनतेवर फारसा विपरीत परिणाम झालेला दिसत नाही, असे नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होते.
|
बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघ जाहीर केला. नव्या निवड समितीची ही पहिलीच निवड असल्याने त्याबद्दल बरीच उत्सुकता होती. परंतु, निवड समितीने जोखीम पत्करण्याचे टाळलेले दिसते. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीर जोडीलाच पुढे चाल देण्याचे धोरण समितीने ठेवले व वेगवान गोलंदाज झहीर खानवर विश्वास टाकला. लोकांना उत्सुकता होती युवराज सिंगची.
|
बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीनंतरचा खेळखंडोबा आणि शासन यंत्रणेचा ढिम्मपणा यामुळे महानगरातील सामान्य जनता व्यथित आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. या मनमानीपुढे हतबलपणाने झुकण्याव्यतिरिक्त सामान्य जनतेच्या हाती दुसरे काही उरलेलेही नाही. पण याच मुद्दय़ावर न्यायव्यवस्थेनेही व्यथित व्हावे, ही शासन यंत्रणेच्या मनमानीची हद्द आहे. ज्यांनी कायदे तयार करायचे, त्यांनाच कायदा शिकवण्याची वेळ न्यायसंस्थेवर यावी, ही गोष्ट लाजिरवाणी आहे.
|
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
चीनने सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात बचावाची भूमिका घेतली आहे. गेली काही वर्षे, विशेषत: ऑलिम्पिक यशस्वीरीत्या आयोजित केल्यापासून चीन आक्रमक धोरणे आखीत होता. परंतु, अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देशांनी चीनबाबत घेतलेला सावध पवित्रा आणि जागतिक मंदी यामुळे चीनला आपली धोरणे मवाळ करावी लागत आहेत. चीनचे आव्हान हा अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा विषय झाला.
|
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे तर सख्खे भाऊ. भावाभावांची भांडणे निवडणूक जसजशी जवळ येते, तशी वाढत जातात. मग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात आणि समस्त महाराष्ट्राची करमणूक करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा थाटात हा कलगीतुरा रंगतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे,’ असे विधान करून नाटकाच्या नव्या अंकाला सुरुवात केली.
|
शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
देशातील चार महानगरांमधील सर्व दूरचित्रवाणी संचांसाठी सेट टॉप बॉक्स बसविण्याचा सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरविला असला, तरी केबल ऑपरेटर्सकडून त्याला होणारा विरोध अद्याप शमलेला नाही. हा विरोध मतलबी आहे व दुर्दैवाने त्याला राजकीय पाठबळ मिळते. कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय सरकारच्या नजरेतून टाळण्याची धडपड असा विरोध करण्यामागे आहे. सेट टॉप बॉक्समुळे ग्राहकांना सुरुवातीला हजार रुपये जादा मोजावे लागणार असले तरी त्यातून होणारे फायदे अनेक आहेत.
|
शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर गप्प बसलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना आता कंठ फुटला असून सध्या ते राज्यभर आपले सत्कार करून घेत आहेत. त्यांचे- म्हणजे फक्त त्यांचेच- भाषण ऐकण्यासाठी पक्षाच्या साऱ्या कार्यकर्त्यांना गोळा करण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीने सारा पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. माध्यमांनी स्वत:हूनच गडकरी यांच्याशी संबंधित संस्थांमधील गैरव्यवहारांचा तपास सुरू केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची फौजच त्यांच्या समर्थनार्थ माध्यमांपुढे िहडू लागली.
|
गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
समाजात काही चांगले घडावे अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करत असतात. मुंबईकरांनी स्वत:च एक पाऊल पुढे टाकून काही चांगले घडविण्याची उत्स्फूर्त सुरुवातदेखील केली आणि त्यामध्ये सहभागी होण्याची संधीही मुंबईकराला मिळाली. त्यासाठी सरकारी फतवा काढला गेला नाही किंवा सरकारी यंत्रणांच्या संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली गेली नाही. ‘आपल्या हितासाठी आपलाच पुढाकार’ हा बाणा पुन्हा एकदा मुंबईकरांनी जागविला.
|
गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे कधीही आमच्याकडे व्हिसासाठी अर्ज करू शकतात, असे सांगून जणू अमेरिकेने आता मोदींनी व्हिसा घ्यावाच, असे आर्जव केले आहे. मोदी हेच पंतप्रधानपदाचे लायक उमेदवार आहेत, या त्यांच्या काही लाख चाहत्यांच्या विश्वासाला बळकटी देणाऱ्या घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडू लागल्या आहेत. २००२ मधील गुजरातमधील नरोडा पतियासारख्या हत्याकांडांमुळे ब्रिटनप्रमाणे अमेरिकेनेही मोदींपासून चार हात लांब राहण्याचे धोरण स्वीकारले होते. मोदींशी व्यापारी संबंध ठेवण्यात आपलेच हित आहे हे कळत असूनही हत्याकांडांचे माप ज्या-त्या आमदाराच्या पदरात सर्वोच्च न्यायालयाने घालण्याची वाट या देशांना पाहावी लागली.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|
Page 1 of 5 |