हिंगोली/वार्ताहर बदलत्या काळात मोबाईल ट्रेकिंग अतिमहत्त्वाचे व उपयुक्त ठरल्याने प्रत्येक जिल्हय़ात मोबाईल ट्रेकिंग पथक तयार करून त्याला आवश्यक ते प्रशिक्षण देण्याच्या सूचना केल्याचे नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी केले. |
परभणी/वार्ताहर दुष्काळग्रस्त मराठवाडय़ास पाणी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी अमलात आणण्याकामी कुचकामी ठरल्याने जलसंपत्ती नियमन प्राधिकरण बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. राजन क्षीरसागर यांनी केली. |
परभणी/वार्ताहर पाथरी तालुक्यात विशेष तपासणीदरम्यान बंद आढळून आलेल्या १० स्वस्त धान्य दुकानांचा परवाना निलंबित, तर काळ्या बाजारात विक्रीसाठी गहू पाठविल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या सय्यद आरेफ याच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. |
लातूर/वार्ताहर दर महिन्याला मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यात लवकरच मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाजपा कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. अतुल जाधव यांनी केले. |
हिंगोली/वार्ताहर जिल्हय़ात यंदा कमी पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई उपाययोजनांसाठी सिद्धेश्वर धरणासह तलावातील उपलब्ध पाण्यापैकी काही साठा आता पिण्यासाठी राखीव ठेवला आहे.जिल्हय़ात गेल्या वर्षी ८७ टक्के पाऊस पडला. |
बीड/वार्ताहर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष जोशी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व खासगी रुग्णालये सोमवारी बंद ठेवण्यात आली. डॉ. जोशी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. |
औरंगाबाद/प्रतिनिधी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला. सप्ताहानिमित्त औरंगाबाद शहर, जिल्हय़ात मेळावे, चर्चासत्र, माहितीपत्रक वाटप, पथनाटय़ाद्वारे भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. |
औरंगाबाद/प्रतिनिधी माथाडी कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हा माथाडी मंडळाचे अध्यक्ष डी. डी. बांबोडे यांनी उपोषणार्थी माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळास दिले. |
आज ग्रंथाचे प्रकाशन औरंगाबाद- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामातील पूर्ण वेळ कार्यकर्ते (चरित्र व कार्य : भाग १)’ या ग्रंथाचे प्रकाशन उद्या (बुधवारी) दुपारी ४ वाजता होणार आहे. |
औरंगाबाद/प्रतिनिधी
महापौर-उपमहापौर निवडीनंतर शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर गुलाल उधळून जल्लोष केला.
महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकावी, या इराद्याने महापौरपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला अखेर तोंडावर आपटी खावी लागली! अपक्ष नगरसेवक राजू शिंदे यांना आपल्या बाजूने वळविल्यानंतर दलित व मुस्लिम नगरसेवकांचे ध्रुवीकरण आपल्या बाजूने होईल, अशी खेळी राष्ट्रवादीने केली होती. शिवसेनेने त्यावर मात केली. |
नांदेड/वार्ताहर पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेला स. मकबूल ‘एमआयएम’चा कार्यकर्ता होता हे खरे असले, तरी त्याच्याविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी त्याची हकालपट्टी केली होती, अशी माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष स. मोईन यांनी दिली. |
अनंत भालेराव स्मृती पुरस्कार महेश एलकुंचवार यांना प्रदान औरंगाबाद/प्रतिनिधी
नाटक ही सामूहिक कला आहे. त्यात भाषावैभव दाखवायचे नसते. अलीकडे वास्तववादी नाटकाच्या नावाखाली अनावश्यक गोष्टी व तपशिलांचा मारा केला जातो. परिणामी मूळ नाटकापर्यंत जाता येत नाही. संभाषण व संवाद यातला फरकच लक्षात घेतला जात नाही. त्यासाठीच संक्षिप्तीकरण, संपादन व गरजेपुरतेच संवाद, तसेच नको त्या पात्रांची व संवादाची काटछाटही तेवढीच गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले. |
परभणी/वार्ताहर शहर हद्दीत १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या स्थानिक संस्था कराविरोधात सोमवारी कडकडीत ‘बंद’ पाळून व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवली. हा ‘बंद’ बेमुदत आहे. शहर महापालिका गतवर्षी १ नोव्हेंबरला अस्तित्वात आली. मात्र, आठच महिन्यांनी सरकारने महापालिका हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला. |
उस्मानाबाद आई राजा उदेऽऽ उदेऽऽ च्या गजरात कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशात लाखो भाविकांच्या उपस्थितीत तुळजापूर नगरी दुमदुमली. कर्नाटक, आंध्र प्रदेश व राज्यातून पायी चालत येणाऱ्या भाविकांचे जत्थे तुळजाभवानी दर्शनासाठी येत होते. |
औरंगाबाद/प्रतिनिधी नोटा खाली पडल्याचे सांगून व्यापाऱ्याच्या मोटारीतून ४० हजार रुपये रक्कम असलेली बॅग भामटय़ाने पळविली. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. जवाहरनगर पोलिसांनी या बाबत नोंद केली. |
लातूर/वार्ताहर वृत्ती प्रबळ असली की व्यवस्था बदलते आणि व्यवस्था प्रबळ असली की वृत्ती बदलते. त्यातून काळय़ा पैशांची निर्मिती होते. आज देशभर काळय़ा पैशाने भारतीय अर्थव्यवस्था पोखरून टाकली असल्याची खंत अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील यांनी व्यक्त केली. |
बीड/वार्ताहर शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँक संधिसाधू लोकांच्या स्वार्थी वृत्तीमुळे बंद पडली आहे. येत्या सहा महिन्यांत बँक सुरू करू, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिली. |
औरंगाबाद/प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शेख आर्शिया खाजामियाँ व परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाचा विद्यार्थी भगवान खिस्ते यांनी प्रथम क्रमांक (विभागून) पटकावला. |
औरंगाबाद/प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना उत्तम व दर्जेदार शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान देणे गरजेचे आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेमध्ये पात्र ठरण्यासाठी उत्तम शिक्षण आत्मसात करण्याची तयारी ठेवा. त्यासाठी राज्यात स्वतंत्र तंत्रनिकेतन विद्यापीठाची गरज आहे, |
औरंगाबाद/प्रतिनिधी भांडण का करता, असे म्हटल्याने संतापलेल्या नातीच्या सासऱ्याने महिलेच्या हातावर फावडय़ाने वार करून गंभीर दुखापत केली. त्यात तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी गुन्ह्य़ाची नोंद केली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 26 |