दिवाळीच्या सलग सुट्टया, शेतमाल विकण्याच्या धावपळीमुळे निर्णय वर्धा / प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्टया व शेतकऱ्यांची शेतमाल विकण्याची धावपळ, या पाश्र्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा या महिन्यातील विदर्भ दौरा रद्द करण्यात आला आहे. |
चंद्रपूर / प्रतिनिधी भंगार विक्रेत्यांकडे मोठय़ा प्रमाणात चोरीचे लोखंड येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून शहरातील दोन बडय़ा भंगार विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानावर छापे टाकून पोलिसांनी तीन ट्रकसह आठ लाखाचे भंगार जप्त केले आहे. यात रहीम करीमलाला काझी, अनिस युनूस खान पठाण, नजीर अहमद अब्दुल मजीद व मनीष गेडाम यांना अटक करण्यात आलेली आहे. |
तलाव व बोडय़ा नामशेष होण्याच्या मार्गावर गोंदिया / वार्ताहर तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्य़ातील प्रत्येक शहरात व गावखेडय़ात तलाव व बोडय़ांची बरीच संख्या आहे, मात्र आज स्थानिक रहिवासी, तसेच भूमाफियांनी या तलाव व बोडय़ांवर अतिक्रमण करणे सुरू केले आहे. |
चंद्रपूर / प्रतिनिधी मृत्यूनंतर इहलोकीचा मार्ग सुसहय़ व्हावा, यासाठी महानगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून शहरातील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अतिशय वाईट अवस्था झालेल्या शांतीधाम, पठाणपुरा व बायपासवरील स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. |
गोंदिया / वार्ताहर घरातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग अनेकदा आपण घरातील एखाद्या कामासाठी करतो किंवा त्याला भंगारात विकतो, मात्र याच टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून दैनंदिन वापरातील वस्तू निर्मितीचे काम अनेक उद्योगधंद्यात केले जाते. |
वर्धा / प्रतिनिधी कोजागिरीच्या पर्वावर येथील जय महाकाली शिक्षण संस्थेत आयोजित ‘सूरमयी श्याम’ या संगीतमय मेजवानीस रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.अग्निहोत्री विद्या संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिध्द भोजपुरी गायिका भारती सिंग (अलाहाबाद) व मुंबईचे गझलगायक उस्ताद आजमअली यांच्या गायनाचा हा बहारदार कार्यक्रम आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर सुरू झाला. |
चंद्रपूर / प्रतिनिधी गडचांदूर ग्राम पंचायतवर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून सरपंचपदी शोभा मडावी, तर उपसरपंच पापय्या पोन्नमवार निवडून आले.सतरा सदस्य संख्या असलेल्या ग्राम पंचायतीत कॉंग्रेसला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या होत्या. |
अमरावती / प्रतिनिधी विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् फेडरेशनच्यावतीने विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार स्पर्धा अमरावती येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत सहकार क्षेत्रातील अग्रेसर राजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला सतत पाचव्या वर्षी आदर्श पतसंस्था पुरस्कार आमदार रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. |
चंद्रपूर / प्रतिनिधी गावाचा विकास साधायचा असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन संघटन शक्ती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयात दत्तक घेतलेल्या मुरसा या गावाला ग्रामविकास प्रकल्प समितीच्या अंतर्गत बचत गटातील महिलांच्या उद्योगाविषयी व महिलांच्या विकासाकरिता महिला मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. |
चंद्रपूर / प्रतिनिधी रमाबाई नगरातील एजाज हुसेन मेहबुब हुसेनला देशीकट्टय़ासह पोलिसांनी अटक केली.रामनगरचे ठाणेदार पी.डी.मडावी यांना मिळालेल्या माहितीनुसार घुग्घुस येथून जवळ शेणगाव येथे वास्तव्याला असलेल्या बिहारातील एजाज हुसेन याचेकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली. |
बुलढाणा/प्रतिनिधी दुर्जन शक्ती पुरातन काळापासून आजपर्यंत सज्जन शक्तीच्या विरोधात ठामपणे उभी राहिली आहे. असे असतांनाही सज्जन शक्ती दुर्जन शक्तीवर सतत विजय मिळवित आली आहे. या प्रक्रियेतून थोर समाजसुधारक अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव यांनाही जावे लागले. त्यांच्या विरोधातही काही दुर्जन शक्ती आहेतच. |
सर्वोत्तम जातीला ३९०० रुपये हमी भाव यवतमाळ / वार्ताहर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
राज्यात पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ अखेर ११ नोव्हेंबरला राज्यातील १०९ केंद्रांवर होणार आहे. वर्धेतील बापूराव देशमुख सूतगिरणीच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके राहणार आहेत. राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मंत्री रणजित कांबळे, पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी, |
मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न देवेंद्र गावंडे , चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ऐन दिवाळीत विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना पवार या दौऱ्यात राजकीय आतीषबाजीच्या माध्यमातून मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. |
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती / प्रतिनिधी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची माहिती मंत्रालयाच्या वेब पोर्टलवर संकलित करण्याचे काम सुरू असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांनी यासाठी दिरंगाई चालवल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महाविद्यालयांना आता विद्यापीठाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. |
यवतमाळ / वार्ताहर पांढरकवडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजे सतराच्या सतराही जागा लढवाव्यात, हा पक्षाचा निर्णय झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे पांढरकवडय़ातील नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती केल्याने राकॉं श्रेंष्ठींच्या नाराजीमुळे ते एकाकी पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. |
चंद्रपूर / प्रतिनिधी येणाऱ्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक व गडचिरोली मतदार संघाची तयारी करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे दिल्लीतील निरीक्षक गिंडगु रुद्रा राजू येत्या ९ नोव्हेंबरला चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत. |
गोंदिया/वार्ताहर सध्याचे युग बदलत आहे. संगणकाच्या या युगात प्रत्येक नागरिक इतका व्यस्त झाला की, सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनात तो आपल्या रुढी-परंपरा विसरत चालता आहे. या रुढी-परंपरा टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळेच लहान मुलींवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी भुलाबाईच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपच्या नगरसेविका भावना कदम यांनी केले. |
गोंदिया/वार्ताहर उड्डाण पुलाखालील शक्ती चौकात पशाच्या वादातून गोळ्या घालून धरम शंकरलाल दावने या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी काल सायंकाळच्या सुमारास अटक केली, तसेच हत्येकरिता वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे. |
नागपूरच्या डी. ठक्कर कंपनीचे तीन टिप्पर जप्त गोंदिया/वार्ताहर रविवारी दुपारी २ वाजता देवरीच्या तहसीलदारांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून पाऊलदौना ते सिरपूर रस्त्यावर अवैधरीत्या गिट्टी आणि मुरुमांची चोरी करीत असताना डी. ठक्कर कंपनीचे ३ टिप्पर पकडले. |
बुलढाणा/प्रतिनिधी वडिलांसह आंघोळीला गेलेल्या २४ वर्षीय युवकाचा रायपूर नजीकच्या डासाळवाडी येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जालना जिल्ह्य़ातील गोंदला येथील नाथा रंगनाथ साळवे व त्यांचा मुलगा मुलगा अनिल नाथा साळवे सकाळी डासाळवाडी येथील तलावावर स्नान करण्यासाठी गेले होते. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 2 of 17 |