सदस्यांचा आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा स्वतंत्र छपाई विभाग असताना लाखो रुपयांच्या छपाईची कामे बाहेरुन का केली जातात, असा प्रश्न उपस्थित करत अर्थ समितीच्या सभेत आज जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी छपाई विभाग पूर्ण क्षमतेने चालवा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला. |
प्रतिनिधी भारत संचार निगममध्ये (बीएसएनएल) मोक्याच्या जागांवर गेली १२ वर्षे ठाण मांडून बसलेल्या भारतीय दूरसंचार सेवा वर्गातील (आयटीएस) अधिकाऱ्यांना परत त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवावे अथवा महामंडळात वर्ग करावे या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी आजपासून देशभर संयुक्त साखळी उपोषण सुरू केले. |
कर्जत/वार्ताहर लोकशासन संघटनेच्या वतीने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला दुपारी अक्काबाई मंदिरापासून सुरुवात झाली. शहरातून मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यावर तेथे जाहीर सभा झाली. |
प्रतिनिधी महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावर कर्मचारी युनियन व प्रशासन यांच्यात उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. युनियनने या विषयावर उद्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्याची नोटीस प्रशासनाला दिली होती. बैठकीमुळे हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. |
भाजप पदाधिकाऱ्याचा मुलगाही सहभागी प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावुन पळ काढणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरटय़ांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका माजी शहराध्यक्षाच्या मुलाचा समावेश आहे.
|
शिर्डीत खडसे यांचा इशारा राहाता/ वार्ताहर धनगर समाज्याच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकारशी संघर्ष सुरुच ठेवणार असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिला. |
प्रतिनिधी जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने दि. १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा निष्काम कर्मयोगी पुरस्कार स्नेहालयला देण्यात येणार आहे. संघाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ राऊत यांनी ही माहिती दिली. |
राहाता/ वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत पक्ष कोणात्याही चौकशीस तयार आहे. काँग्रेस पक्ष मात्र रॉबर्ट वढेरांच्या चौकशीची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. |
प्रतिनिधी महावितरण कंपनीने औद्योगिक क्षेत्रासाठी अचानक लागू केलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात नगरमधील उद्योजकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. वीज दरवाढीच्या विरोधात नगरचे उद्योजक मंगळवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी व महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. |
शब्दगंधची दशकपुर्ती प्रतिनिधी शब्दगंध साहित्य परिषदेच्या दशकपुर्ती वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या स्त्री-भ्रुण हत्या विषयावरील कथा व कविता लेखन स्पर्धेत तुकाराम मोहन जरांगे (कविता लेखन, रु. १ हजार १, जाफराबाद) व रघुनाथ शरद कुलकर्णी (कथा लेखन, रु. १ हजार १, लातुर) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. |
प्रतिनिधी राज्य नाटय़ स्पर्धेत जय बजरंग कला मंडळाच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या ‘निशब्द: वृक्षावर कातरवेळी’ या दोन अंकी नाटकाच्या तालमीचा शुभारंभ ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद खेर यांच्या हस्ते व ‘लोकसत्ता’चे ब्युरो चिफ महेंद्र कुलकर्णी, डॉ. सुचित तांबोळी, प्रा. चं. वि. जोशी, कथाकार संजय कळमकर, पत्रकार श्रीराम जोशी, दशमीगव्हाणचे सरपंच बाळासाहेब काळे, प्रा. सुभाष काळे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करुन करण्यात आला. |
प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्य़ाचा १४ वर्षांखालील संघ निवडण्यात आला. निवड चाचणीसाठी २०० खेळाडू आले होते, त्यातील २१ जणांची निवड करण्यात आल्याची मााहिती जिल्हा संघटनेचे सचिव संजय बोरा यांनी दिली. |
प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीमुळे (एफडीआय) देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याने काँग्रेस सरकारचा हा निर्णय क्रांतीकारी आहे. विरोधक केवळ राजकीय कारणातून त्यास विरोध करत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. |
अकोले/वार्ताहर जुन्या पिढीतील वेदशास्त्र संपन्न भास्करराव नरहर तथा भास्करगुरू धर्माधिकारी यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. |
भंडारदराचा विसर्ग थांबवला अकोले/वार्ताहर भंडारदरा, निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा अंतिम टप्पा आज सुरू झाला. आज दुपारी भंडारदऱ्यातून पाणी सोडणे पूर्णपणे थांबविण्यात आले. |
आ. शिंदे यांचे निवेदन प्रतिनिधी कर्जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तालुक्यातील पाझर तलाव कुकडीचे पाणी सोडून भरले तर ही टंचाई दूर होईल, त्यामुळे कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे केली. |
कर्जत/वार्ताहर दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आज गारपीट व वादळी पावसाने आणखी एक संकट उभे केले. तालुक्यातील दगडी बारडगांव, तलवडी, धालवडी, कुळधरण व राशीनच्या काही परिसरात आज सायंकाळी वादळी पाऊस व गारपीट झाली. |
पेटवताना पतीही भाजला श्रीरामपूर/प्रतिनिधी शहरालगत असणऱ्या टिळकनगर परिसरात हनुमानवाडी येथील जयश्री गणेश जाधव या तरूणीस तिची सासू व नवऱ्याने रॉकेल टाकून पेटवून दिले. यात ही महिला गंभीररित्या भाजली असून पेटवून देणारा नवराही भाजला आहे. ही खळबळजनक घटना गुरूवारी दुपारी दीड वाजता घडली. |
मनपाचे ‘आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ प्रतिनिधी सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेचे आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असे सुरू आहे. डासांची उत्पतीच थांबवणारे अॅबट हे औषध वापरायचे सोडून डासांना निव्वळ गुंगी आणणारी धूर फवारणीच सर्वत्र सुरू आहे. नगरसेवकही आपापल्या प्रभागात ही अनावश्यक व प्रदूषण करणारी फवारणी व्हावी यासाठी आरोग्य विभागात खेटे घालत आहेत. |
प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० ऑक्टोबरला निदर्शने करून लक्षवेध दिन पाळण्यात येणार आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 8 of 21 |