प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, ५ हजार रूपये सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ३५ लाख रूपयांचे वाटप व डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना सण अग्रीम अशा तडजोडीवर महापालिका कर्मचारी युनियनने गेले काही दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन आज रात्री थांबवले. |
साडेपाच टीएमसी पाणी, ७२ तलाव भरणार कर्जत, पारनेर/वार्ताहर जिल्ह्य़ातील ७२ तलावांत कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या कुकडी कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उद्या (बुधवार) हे आवर्तन सोडण्यात येणार असून पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यांतील तलावांत ५.६३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. |
प्रतिनिधी महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली विभागाने आज पुन्हा शहरातील तब्बल ८७ व्यापाऱ्यांचा विविध स्वरूपाचा माल ताब्यात घेतला. एलबीटी कायद्यांतर्गत त्यांनी आपल्या फर्मची नोंदणी मनपाकडे केली नसल्याने ही कारवाई झाली. |
अकोले/वार्ताहर निळवंडे धरणातून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन चार दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणातून मध्यंतरी जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले, मात्र हे पाणी मुख्यता भंडारदरा धरणातून सोडण्यात आले हाते. |
प्रतिनिधी आधीच अनियमीत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेची संक्रात आली आहे. मात्र, जिल्ह्य़ाच्या सन २०१३-१४ च्या वार्षिक प्रारूप आराखडय़ास मंजुरी घ्यायची असल्याने विनाप्रसिद्धी व आचारसंहिता क्षेत्रासाठी नव्या योजना जाहीर न करता ८ नोव्हेंबरला नियोजन भवनात ही बैठक होणार आहे. |
प्रतिनिधी थोडेथोडके नाही तर तब्बल १२० एलसीडी व एलएडी दूरचित्रवाणी संच नागापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक ७९ मधील गोदामातून पळवून नेण्यात आले. चित्रपटातच शोभेल अशा या चोरीचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नसून गोदाम मालकानेही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. |
महेश जोशी कोपरगाव तालुक्याचा पाणीप्रश्न हा दिवंगत नेते शंकरराव काळे यांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या निधनाने या संघर्षांतील अग्रणी हरपल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे. |
प्रतिनिधी/ठिकठिकाणचे वार्ताहर ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. शेती-सहकार, राजकारण, ग्रामीण अर्थकारण याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करताना त्यांनी राज्यात या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाने नगर जिल्ह्य़ाला प्रगतीच्या दिशेने नेण्यात महत्वाची कामगिरी बजावल्याच्या भावना या सर्वानी व्यक्त केल्या. |
खंडपीठात जनहित याचिका दाखल प्रतिनिधी खासगीकरणातून झालेल्या नगर ते कोल्हार या रस्त्याचे काम मोठय़ा प्रमाणात अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू करण्यात आली, तसेच मूळ प्रकल्प अहवालानुसार होणारी अनेक कामे वगळण्यात आल्यानंतरही ठेकेदाराच्या फायद्यासाठी २५ कोटी रुपयांची वाढीव टोल वसुली करण्यास परवानगी दिल्याबद्दल हरकत घेणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली असून राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी ४ आठवडय़ांत म्हणणे सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. |
प्रतिनिधी महिला सक्षमीकरण व बाल विकास क्षेत्रातील पथदर्शी कार्याबद्दल नगरच्या स्नेहालय संस्थेस नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘डॉ. दुर्गाबाई देशमुख राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्नेहालयचे विश्वस्त मिलिंद कुलकर्णी यांनी तो स्वीकारला. ५ लाख रु. सन्मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. |
अनुराधा ठाकूर यांचा बहुमान प्रतिनिधी महाराष्ट्र, आंध्र व दिल्ली या तीन राज्यांत एकाच वेळी फक्त एकटय़ाच्या चित्रांकृतींचे प्रदर्शन होण्याचा बहुमान नगरच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांनी मिळवला आहे. ही सर्व चित्र चित्रमालिका या स्वरूपात असून त्यातही पुन्हा आदिवासींच्या जीवनशैलीवर आधारीत आहेत हेही या प्रदर्शनांचे एक अनोखे वैशिष्टय़ आहे. असा मान मिळवणाऱ्या त्या नगरमधील पहिल्याच चित्रकार आहेत. |
कोपरगाव/वार्ताहर ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये दि. २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोनेवाडी, बहादरपूर, करंजी चांदेकसारे, धारणगाव, खोपडी, तळेगाव मळे या गावांचा यात समावेश आहे. एकूण ६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. |
स्वाभिमानी संघटनेचा आज चक्का जाम प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
ऊसभावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले असून पहिली उचल तीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी आज नेवासे तालुक्यातील नागापूर येथे संघटनेच्या वतीने रास्ता रोको करून कारखान्यावर जाणाऱ्या उसाच्या मालमोटारी अडविण्यात आल्या. उद्यापासून (मंगळवार) चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी सांगितले. |
विखे कारखान्याचा पहिला हप्ता २ हजार २००- मंत्री विखे राहाता/वार्ताहर
उसाची एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी साखर आयुक्तालयाने पाचकलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. सहकारी साखर कारखान्यांना आता एनर्जी व कॉस्ट ऑडीट करण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले असून, हे ऑडीट कारखान्यांना सक्तीचे करण्यात आल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. |
प्रतिनिधी पर्यावरण व पर्यटनाचे महत्व सगळ्या जगाला कळले आहे, मात्र आपले सरकार जागे व्हायला तयार नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. पत्रकार राजेश सटाणकर यांच्या सिटी टाईम्स या साप्ताहिकाच्या रौप्यमहोत्सवी पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे झाले. |
थोरात कारखान्याच्या गळिताला प्रारंभ संगमनेर/वार्ताहर राज्यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत संगमनेर कारखान्याचा आलेख सतत चढता राहिला आहे. चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही परिस्थितीत चांगला भाव देण्याची परंपरा आपण जोपासली आहे. |
मनपा स्थायीत उद्या निर्णय प्रतिनिधी महापालिकेला अखेर पारगमन कराची रक्कम कमी करणे भाग पडले आहे. पदाधिकाऱ्यांनी अंदाजेच निश्चित केलेल्या वार्षिक २८ कोटी रूपयांच्या निविदेला काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आता ही रक्कम २० कोटी करण्यात आली आहे. |
मोहनीराज लहाडे काही वर्षांपूर्वी कुपोषित बालकांच्या संख्येमुळे चर्चेत असलेल्या नगर जिल्ह्य़ाने कुपोषणमुक्तीत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. ‘युनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसह पंतप्रधानांच्या सल्लागार समितीने याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या कामाचे कौतूक केले. |
प्रतिनिधी आर्थिक डोलारा कोसळू लागल्याने महापालिकेने आता स्थानिक संस्था कर (एलबीटी) चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाईस सुरूवात केली. |
कृषिमंत्री विखे यांचे शेतकरी संघटनेला आव्हान राहाता/वार्ताहर राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने शेतकरी संघटनेने चालवायला घेऊन सभासदांना तीन ते चार हजार रुपये टनाप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, असे आव्हान राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 3 of 21 |