इतिहासात आज दिनांक.. : १ नोव्हेंबर १८५८इंग्लंडची तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया हिच्या नावाने एक जाहीरनामा भारतात प्रसृत करण्यात आला. यालाच ‘राणीचा जाहीरनामा’ असे म्हणतात. या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून हिंदुस्थानचा कारभार काढून घेऊन तो पार्लमेंटकडे गेला. राणीच्या वंशजांशी भारतीयांनी राजनिष्ठ राहून ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आज्ञापालन करावे. लॉर्ड कॅनिंग हे राणीचे पहिले प्रतिनिधी या नात्याने भारतावर त्यांची सत्ता चालणार. हिंदुस्थानातील संस्थानिकांशी करण्यात आलेले करारमदार पाळण्यात येतील. त्यांचे हक्क, मान व अधिकार यांची जपणूक करण्यात येईल. सध्या अंमल असलेल्या प्रदेशात भर घालण्याची पार्लमेंटची इच्छा नाही. परंतु आमच्या राज्यावर आक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार करू. प्रजेतील नोकरांना अधिकारांच्या जागांवर नेमताना शिक्षण, लायकी, शील यांचाच विचार केला जाईल. नवे कायदे करताना किंवा जुन्यांची अंमलबजावणी करताना लोकांचे पूर्वापार हक्क, चालिरीती, वहिवाटी यांकडे लक्ष देणार. भारतातील उद्योगधंद्यांना उत्तेजन देणे, सार्वजनिक उपयोग व सुधारणेची कामे हाती घेणे हे कार्य करू. १९५६ राज्य (भाषावार) पुनर्रचना कायदा अमलात आणण्यास सुरुवात झाली. आंध्र प्रदेश, केरळ व म्हैसूर (पुढे कर्नाटक) राज्यांची स्थापना. १९७८हरिहर गुरुनाथ कुलकर्णी ऊर्फ कुंजविहारी या कवी, स्वातंत्र्यसैनिक व सोलापुरातील अनेक विधायक उपक्रमांचे संयोजक यांचे निधन. ‘समग्र कुंजविहारी’ हा ग्रंथच त्यांचे स्मारक होय. डॉ. गणेश राऊत -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सफर काल-पर्वाची : ओटोमन साम्राज्याची स्थापना उत्तर आशियाच्या गवताळ कुरणांच्या प्रदेशात राहणाऱ्या तुर्की भटक्या जमातींना आक्रमक मंगोल टोळ्यांनी तिथून हुसकले. त्या टोळ्या अनातोलिया म्हणजे हल्लीच्या मध्य तुर्कस्तान या भागात येऊन राहू लागल्या. त्या टोळ्यांतील बहुतेकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. या टोळ्यांपैकी सेल्जुक या टोळीने दहाव्या शतकात आपले भटके जीवन थांबवून ते स्थिर झाले. त्यांनी मध्यवर्ती प्रशासन व कर आकारणी सुरू केले. थोडय़ाच दिवसांत ते सर्व टोळ्यांपेक्षा प्रबळ होऊन त्यांनी काँस्टंटिनोपल येथे आपले मुख्य ठाणे केले, पण बाकीच्या दहा तुर्की भटक्या टोळ्यांनी मात्र आपल्या गाझी परंपरेनुसार भटके जीवनच चालू ठेवले. या टोळीवाल्यांनी प्रथम ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या लोकांचा पशुपालन हा व्यवसाय होता; परंतु हे लोक जमेल तेथे लूटमार करणे हेही करीत. पुढे त्या टोळीवाल्यांचा इस्लामशी संबंध आला. सातव्या शतकात आपल्या धर्माच्या रक्षणासाठी व प्रसारासाठी अरबस्थानात इस्लामी लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. खलिफांनी आशिया व युरोपात शिरून इस्लामी साम्राज्य उभे केले. तलवारीच्या जोरावर राज्ये जिंकून लोकांना बाटविणे किंवा जबर कर भरावयास लावणे ते करीत. भटके तुर्की टोळीवाले अरबी भागात शिरून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. काही टोळीवाले अरबी सैन्यात भरती झाले. सेल्जुक टोळीवाल्यांनी आधीच स्थिर होऊन आपल्या राज्याचा विस्तार केला होता; परंतु आपसातल्या भांडणाचे पर्यवसान सेल्जुक राजवट नष्ट होण्यात झाली. त्याच वेळी इतर टोळ्यांपैकी उस्मान हा टोळीप्रमुख पुढे येऊन सर्व टोळ्यांचा प्रमुख होऊन त्याने इ.स. १२९९ मध्ये राज्य स्थापन केले. उस्मान या नावाचा अपभ्रंश प्रथम ओत्तमन असा झाला व पाश्चात्त्य, युरोपियन यांनी त्याचे ‘ओटोमन’ असे केले. सुनीत पोतनीस -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुतूहल : पाळीव प्राण्यांपासून होणारे रोग
गाय, बल, कुत्रे, मांजर, कोंबडय़ा, पोपट, शेळ्या, मेंढय़ा हे प्राणी पाळीव प्राणी म्हणून आपल्याला परिचित आहेत. याबरोबरच अस्वल, माकड, साप, मोर हे प्राणीही पाळले जातात. सुरुवातीला अन्नाची गरज भागविण्यासाठी माणसाने प्राणी पाळण्यास सुरुवात केली. त्याबरोबर प्राण्यांपासून चामडे किंवा कातडे मिळवणे, लोकर मिळवणे अशा कारणांसाठी पाळीव प्राण्यांचा उपयोग केला जातो. एवढेच नाही तर कधी कधी माकड, अस्वल, साप या प्राण्यांचे खेळ करून उदरनिर्वाह करणे हासुद्धा प्राणी पाळण्यामागचा उद्देश असतो. माणूस हा मुळात स्वार्थी असला तरी प्राण्यांशी मैत्री करणे, प्राण्यांविषयीचे प्रेम असा नि:स्वार्थीपणासुद्धा प्राणी पाळण्यात असतो. पाळीव प्राणी जेव्हा आपल्या सहवासात असतात तेव्हा या प्राण्यांपासून आपल्याला कळत नकळत उपद्रव हा होतच असतो. कुत्री किंवा मांजरे यांना न्यूरोटॉपिक या जंतुसंसर्गामुळे रेबीज किंवा अलर्क हा रोग होतो. पिसाळलेल्या प्राण्यांच्या लाळेमध्ये हे विषाणू असतात. या जंतूचा संसर्ग झालेले कुत्रे, मांजरे इतर प्राण्यांना चावल्यास त्यांच्या शरीरात रेबीजचे जंतू प्रवेश करतात. कुत्रा चावल्यानंतर त्याला रेबीज झाला होता का हे पाहणे महत्त्वाचे असते. कुत्रा पाळीव असेल तर त्याचे बारकाईने निरीक्षण केले तर ते समजू शकते. कुत्र्यामध्ये पुढील लक्षणे आढळल्यास त्याला रेबीज झाला आहे असे समजावे. कुत्रा रागीट होणे, कुत्र्यांच्या आवाजात फरक पडणे, गिळताना त्रास होणे, पाय, अंग लुळे पडणे पुढे पाच ते सात दिवसांत कुत्रा मृत्यू पावणे. कुत्रा चावल्यानंतर लगेचच जखम साबणाने धुवावी त्यावर सोफ्रामायसिन लावावे त्यामुळे जंतू मरतात. जखम बांधून ठेवू नये. हा झाला साधा प्रथमोपचार. कुत्रा चावल्यानंतर तो रेबीज बाधित होता किंवा नाही हे न बघता रेबीजसाठी प्रतिबंधात्मक लस घेणे उत्तम. तसेच धनुर्वाताची लसही घेणे आवश्यक आहे. सुचेता भिडे मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी , मुंबई २२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोराचा पिसारा.. : सूर आले जुळूनी..
मानस, किती दिवसानं भेटलास रे! कामाच्या धावपळीत, तुझ्यासारख्या जिवलग मित्राशी गप्पा मारता येत नाहीत. तुला भेटलं की स्वत:शी नवा संवाद सुरू होतो. जुन्या संवादातली अर्थपूर्ण सूत्रं पुन्हा गवसतात. खूप छान वाटतं.. ‘‘अगदी खरंय रे, बीन मिसिंग यू! मलादेखील असं वाटत होतं की, तुझ्याबरोबर बोलावं, जस्ट भेटावं. माझ्या मनात तीच इच्छा होती..’’ मानस नेहमीप्रमाणे थट्टामस्करी न करता म्हणाला आणि आम्ही खुदकन हसलो. ‘‘येस मानस, याच विषयावर बोलायचं होतं. बऱ्याच वेळा एक आगळा अनुभव येतो. आपण एखादी इच्छा मनात धरतो, अमुकला भेटावं, तमुकला फोन करावा. एखाद्या व्यक्तीशी भेटगाठ घडावी आणि मानस, नेमका तोच मित्र, तीच मैत्रीण, भाऊ-बहीण आपल्याला भेटतात. गंमत म्हणजे, समोरच्या व्यक्तीला तसंच वाटतं. जणू काही आपण ठरवून भेटतोय. आधी वेळ ठरवून, भेटगाठ होतेय. मैत्रिणीला फोन लावण्यासाठी मोबाइल हातात घ्यावा, तो तिचाच फोन येतो. मला जे विचारायचं असतं, तेच तिला सांगायचं असतं. नवल वाटतं अशा योगायोगांचं. मानस मला सांग, असं खरंच काही असतं का? मला वाटतं, याला टेलिपथी म्हणतात ना?’’ मानस मंद स्मित करीत म्हणाला, ‘‘येस, अशा अनुभवांना ‘टेलिपथी’ म्हणतात.’ याला काही शास्त्रीय आधार आहे का? असं विचारलंस तर मात्र यावर पुरेसा रिसर्च झालेला नाही आणि खरं सांगायचं तर असे मानसिक प्रयोग करणं तसं कठीण आहे. त्याचा ‘स्टॅटिस्टिकल’ संख्याशास्त्रीय पुरावा तयार करणं जवळजवळ अशक्य आहे. ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे, असं मात्र नक्की म्हणता येईल. लाखो लोकांना तसे अनुभव आलेले आहेत. याउलट असे योगायोग आपल्या आयुष्यात घडावे, अशी प्रखर इच्छा असूनही तसे अनुभव येत नाहीत. असंदेखील काही लोक म्हणतात. मित्रा, खरोखर त्यामुळे फार फरक पडत नाही. एक गोष्ट नक्की आहे की, आपल्या इच्छाशक्तीला हवा तसा होकारात्मक प्रतिसाद मात्र नक्की मिळतो. उदा. एखादं गाणं, विचार किंवा भावना एकाच वेळी अनेकांना सुचतात आणि ते सगळे एकत्र येतात. अशा रीतीने एकमेकांची मनं जुळून येणं, विचार शेअर होणं अशा अनुभवांना ‘टेलिपथी’ न म्हणता ‘सिंक्रॉनिसिटी’ म्हणतात. आपली तीव्र इच्छा आणि विचार अदृष्य लहरींप्रमाणे परिसरात पसरतात. दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्या व्यक्तीचा जणू काही ‘अॅन्टेना’च त्या लहरी पकडतो, कॅप्चर करतो आणि ते विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. आपल्या मनातला विचारांचा ट्रान्समीटर अशा विचारसुरांच्या लहरी बाहेर सोडतो आणि आपणही काही विचार आपल्या मनाच्या अॅन्टेना (किंवा डिश) वरून उतरून घेतो. असे अनुभव येतात हे खरंय. अशी स्िंाक्रॉनिसिटी मनाला सुखद धक्के देते. त्या अनुभवावर आपला विश्वास बसतो. आपण अधिक सजगतेने आपले विचार त्यांची व्हायब्रेशन प्रसारित करतो आणि रिसिव्ह करतो. मैत्र जुळतं. जसं तुझं नि माझं. यातूनच मनमोराचा पिसारा फुलतो.’’ डॉ. राजेंद्र बर्वे - १ि१ं्नील्ल१िुंं१५ी@ॠें्र’.ूे |